Sat. Dec 6th, 2025

लेटेस्ट मुद्दे

Devendra Fadnavis : कर्नाक उड्डाणपुलाचे नाव आता ‘सिंदूर उड्डाणपूल’, मुख्यमंत्र्यांनी केले उद्घाटन

दक्षिण मुंबईतील नूतनीकरण केलेल्या कर्नाक उड्डाणपुलाचे नाव आता ‘सिंदूर उड्डाणपूल’ असे ठेवण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेने या पुलाच्या नावात बदल केला असून, हे नाव भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या पाकिस्तानविरुद्धच्या लष्करी कारवाईपासून प्रेरित आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या पुलाचे उद्घाटन आज फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकाचा उल्लेख करत काळ्या इतिहासाच्या पानांचा संदर्भ दिला.

हा पूल दक्षिण मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडतो. यापूर्वी हा पूल कर्नाक पूल म्हणून ओळखला जात होता, ज्याचे नाव 1839-1841 दरम्यान मुंबई प्रांताचे राज्यपाल जेम्स रिव्हेट कर्नाक यांच्यावरून ठेवण्यात आले होते. आता ‘ऑपरेशन सिंदूर’च्या स्मरणार्थ या पुलाला ‘सिंदूर पूल’ असे नाव देण्यात आले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी, एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा, बड्या नेत्याच्या भेटीने खळबळ

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगवान घडामोडी सुरु आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ९ जुलै २०२५ रोजी दिल्ली दौरा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दौऱ्यात त्यांनी भाजपच्या काही बड्या केंद्रीय नेत्यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. […]

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. ही भेट गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सदिच्छा भेट असल्याचे बोलले जात असले. मात्र अद्याप याला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अशा उच्चस्तरीय भेटीगाठी नेहमीच राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असतात. त्यात सध्या राज्यात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अस्थिरतेचे वातावरण आहे. महाविकास आघाडीतील कुरबुरी, आगामी निवडणुका, ठाकरे बंधू आणि विविध पक्षांमधील अंतर्गत मतभेद अशा अनेक गोष्टींमुळे राजकीय परिस्थिती सतत बदलत आहे. एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यात या सर्व राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. सूत्रांच्या मते, एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील सद्यस्थितीबद्दल आपले मत आणि भूमिका केंद्रीय नेत्यांसमोर मांडली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी निवृत्त होणं हे देशासाठी शुभसंकेत, संजय राऊतांचा खोचक टोला

संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी ७५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवृत्तीबाबत भाष्य केले आहे. मोहन भागवत यांच्या विधानाचा उल्लेख करत राऊत यांनी मोदींची निवृत्ती देशासाठी शुभसंकेत असल्याचे म्हटले आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा ७५ वर्षांचे होत आहेत. त्यामुळे ते निवृत्ती घेणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. त्यातच सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंच्याहत्तरीची शाल जेव्हा अंगावर पडते, तेव्हा याचा अर्थ थांबायचा असतो, असे विधान एका कार्यक्रमात केले होते. त्यावर आता  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी निवृत्त होतात हे देशासाठी शुभसंकेत आहेत, असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला.